Anam Vira swadhyay iyatta satavi marathi | इयत्ता सातवी विषय मराठी अनाम वीरा स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र. १.
कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते?
(अ) स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात !
उत्तर: 
        देशाचे रक्षण करण्यासाठी प्राण देणारे
सैनिक लोकांना अपरिचित असतात, लोकांना प्रत्येकाची नावेसुद्धा माहिती नसतात.
म्हणून कवी म्हणतात देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांनी, जिथे प्राण सोडले, तिथे
त्यांचे कुणी स्मारक उभारले नाही की स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योत
पेटवली नाही.
(आ) जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !
उत्तर:  
        सैनिकांचे जीवन असे असते की, लढाई सुरु
झाल्यावर त्याला त्याच्या घरातून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या कर्तव्यास हजर
रहावेच लागते. शिवाय पुन्हा परत घरी कधी परतणार याचीही शाश्वती नसते, म्हणून लढाईच्या
अग्निकुंडात जाळण्यासाठी तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जातोस , असे कवींनी
म्हटले आहे. 
(इ) सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान !
उत्तर: 
        कवी म्हणतात की, या सैनिकाला प्रसिद्धीची
गरज नसतेच. देशासाठी लढणे व लढता लढता वीरमरण पत्करणे हेच सैनिकाचे व्रत आहे म्हणून
तुझे हे बलिदान सफलच आहे, असे कवींनी म्हटले आहे. 
प्र. २. खालील आकृती पूर्ण करा.
देशासाठी
प्राणार्पण केलेला सैनिक ‘अनाम’ राहिला आहे, असे कवींना वाटते, त्याची कारणे लिहा.
उत्तर:
· अनाम वीराचे कुणी स्मारक उभारले नाही.
· त्याच्या स्मरणार्थ कुणी दिवा लावला नाही .
· जनसेवा करूनही कुणाची भावना उधाणली नाही.
· रियासतीवर त्याचे नाव कोरले नाही.
· कुणा शाहिराने डफाबरोबर त्याची यशोगाथा गायिली नाही.
प्र. ३. खालील जोड्या जुळवा.
 
| 
   ‘अ’ गट  | 
  
   ‘ब’ गट (उत्तरे )   | 
 
| 
   (१)धगधगतां समराच्या ज्वाला  | 
  
   (ई) महाभयंकर युद्ध  | 
 
| 
   (२) मरणामध्येविलीन  | 
  
   (अ)शांतपणे मरण स्वीकारणे  | 
 
| 
   (३) ना भय ना आशा  | 
  
   (आ) निर्भयपणे, मनात कोणतीही आसक्ती न ठेवता  | 
 
| 
   (४) नच उधाणले भाव  | 
  
   (इ) भावना व्यक्त न करणे  | 
 
प्र. ४. खालील शब्दांचा तुम्हांला समजलेला अर्थलिहा.
उत्तर:
(१) अनाम वीरा- 
उत्तर: ज्या
वीराच्या कर्तबगारीची कोणीही दाखल घेतली नाही . अज्ञात वीर. 
(२) जीवनान्त- 
उत्तर:जीवनाचा
शेवट , म्हणजेच मृत्यू. 
(३)
संध्येच्या रेषा-
उत्तर:
संध्याकाळी जसजसा सूर्यास्त होतो. तशी क्षितीजरेषा धूसर होत जाते, त्यास
संध्येच्या रेषा म्हणतात. 
(४) मृत्युंजय
वीर-
उत्तर:
मृत्यूवर विजय मिळवलेला वीर.
लिहिते
होऊया. 
तुम्ही कोण
होणार,
ते ठरवा. त्यासंबंधित खाली काही प्रश्न दिले आहेत, त्यांवर विचार करा. त्या प्रश्नांची
उत्तर: 
        बालपणापासूनच मला वाचनाची व लेखनाची आवड
आहे. डॉक्टर फक्त रुग्णाचे शरीर निरोगी ठेवतो. पण लेखन समाजचे मन निरोगी ठेवते. शिवाय
आपला संसारही सांभाळता येतो आणि लेखनही करता येते. असे असूनही लेखकच अजरामर  होतात.त्यांच्या मृत्युनंतर  कितीही वर्षे लोटली तरी पुढच्या पिढी स्मरणात ठेवतात.
. उदा. पु.ल. देशपांडे, कुसुमाग्रज या पुस्तकातील पाठांचे लेखक आजही आम्ही अभ्यासत
आहोत. मी लेखक होणार ! हे कुटुंबातील सदस्यांना सांगितले तर त्यांना खूप आनंद झाला
. लेखक होण्यासाठी मी  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखकाचे
साहित्य वाचून काढणार आहे.  त्यांच्या
विविध अनुभवांचा अभ्यास करून त्यांची शैलीही आत्मसात करणार आहे. मी लेखक झाल्यावर
संपूर्ण जगभर प्रवास कारीन. देववादी व दैववादी रूढींवर प्रखर हल्ले चढवून समाजातील
अंधश्रद्धा दूर करीन. हे करताना कितीही संकटे कोसळली तरी डगमगणार नाही, प्रलोभनाला
बळी पडणार नाही, लाचारी पत्करणार नाही. मला लेखक म्हणून एक पारितोषिक मिळावे हे
माझे स्वप्न आहे. 
म्हणी ओळखूया.
खालील वाक्ये वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हणी लिहा.
(१) गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्तीहोती,
तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पैपाहुण्यांचा राबता होता. जसे ते
सेवानिवृत्त झाले, तसा माणसांचा वावर कमी झाला आहे, म्हणतात ना.......
उत्तर: असतील
शिते तर जमतील भुते.
(२) रेहानाची कंपासपेटी हरवली, तिने ती घरभर शोधली.
शेजारीपाजारीही जाऊन पाहिले; पण कंपासपेटी कोठेच नव्हती.
शेवटी ती रेहानाच्याच दप्तरातच सापडली, म्हणतात ना.......
उत्तर:
काखेत कळसा आणी गावाला वळसा. 
(३) पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला,
की घर बांधायचे. पावसाळा संपला, पण इकडे तिकडे
फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले,
की आपण घर बांधायचे ठरवले होते, म्हणतात ना.......
उत्तर: शेकली
तेव्हा टेकली.
(४) फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते.
त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला, तसतसे त्याच्यात
हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले,.......
उत्तर: बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.
खालील उतारा
वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा.
मुलांनो
शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे
अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हांला
निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी
देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी
जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्गहाच आपला खरा मित्र आहे.
उत्तर: 
मुलांनो, शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र ? असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल आपल्याला फळे, फुले, सावली देणारे वृक्ष,आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्गहाच आपला खरा मित्र आहे!
*********
